September 9, 2024 5:59 PM

views 22

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याच्या मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याच्या सूचना  मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा इथल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या  भागाची पाहणी पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.