February 3, 2025 11:28 AM

views 25

पुरुषांच्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना काल भारतीय संघाने दीडशे धावांनी जिंकला. वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 63 चेंडूत, 97 धावांवर बाद झाला.