November 8, 2025 2:48 PM

views 79

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट शेवटचा सामना ब्रिस्बेनमधे रंगणार

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे.

February 2, 2025 8:09 PM

views 45

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १२ षटकात ३ बाद १६१ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.

November 25, 2024 7:09 PM

views 35

भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी

बॉर्डर- गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १- शून्यने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला २९५ धावांनी धूळ चारली. हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक ठरला.   भारताचा कर्णधार जसप्रित बुमरा आणि मोहम्मद सिराज  यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ २३८ धावांमधे गुंडाळला गेला. तत्पूर्वी विराट कोहलीची नाब...