December 31, 2024 8:18 PM

views 24

गेल्या दीड वर्षात झालेल्या हिंसाचाराबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मागितली माफी

गेल्या दीड वर्षात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत  मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यातल्या  जनतेची माफी मागितली आहे. यंदाचं   संपूर्ण वर्षही राज्याला खूप वाईट गेलं.  अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं,  अनेकांनी घरे सोडली,  यासाठी  आपल्याला  दु:ख आणि पश्चात्ताप होत  आहे. मणिपूर राज्यात 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल आपण राज्यातल्या  जनतेची माफी मागतो, असं  ते म्हणाले. गेल्या तीन-चार महिन्यांतली शांततापूर्ण परिस्थिती पाहता, 2025 मध्ये राज्यातली स्थिती पूर्ववत होईल अशी  आशा...

November 22, 2024 1:03 PM

views 29

काँग्रेसने मणिपूरमधली परिस्थिती संवेदनशील केल्याचा भाजपचा आरोप

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर मणिपूरमधली परिस्थिती जाणीवपूर्वक संवेदनशील केल्याचा आरोप केला आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राला नड्डा यांनी उत्तर दिलं आहे. मणिपूरमधली शांतता भंग करण्यासाठी कट्टरतावादी संघटना सातत्याने प्रयत्न करत राहतात, हे काँग्रेसच्या प्रशासनाचं अपयश आहे, अशी टीका नड्डा यांनी आपल्या पत्रात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे गेल्या दहा वर्षांत ईशान्य भारतात अ...

November 18, 2024 1:00 PM

views 41

मणिपूर हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र निषेध

मणिपूरमधे गेले दोन दिवस उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला असून केंद्र आणि राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांभीर्याने तातडीचे उपाय केले पाहीजेत असं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राज्यात दोन समुदायांमधे सुरु झालेला संघर्ष अद्याप धुमसतो आहे. महिला आणि मुलांचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे माणुसकीला काळिमा फासणारं भ्याड कृत्य असल्याचं मणिपूर आरएसएसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या दोन दिवसात मणिपूरमधे विशेष...

November 18, 2024 10:01 AM

views 33

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा आजही नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक घेणार असून एकंदर सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. काल मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी झालेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्युमुखी पडले असून सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. यामध्ये सामील असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं गृह मंत्रालयानं प्रसिद...