September 6, 2024 6:40 PM

views 33

परदेशी गुंतवणूकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी  असलेल्या महाराष्ट्रानं  चालू  आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे.  एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या  एकूण गुंतवणुकीच्या 52 पूर्णांक 46 शतांश टक्के म्हणजेच सुमारे 70 हजार 795 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे  ही माहिती दिली. इतर आठ राज्यांमधल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य स...

September 5, 2024 8:30 PM

views 17

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३०७ कोटी रुपयांचा निधी द्यायला मान्यता

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून ३०७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करायला राज्यशासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णयही आज जारी केला आहे. शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळती करु नये, याची काळजी घेण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

September 4, 2024 4:02 PM

views 16

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   विदर्भात काही भागात पावसाची संततधार राहणार असून सातारा आणि पुणे तसंच, पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह इतर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

September 3, 2024 7:23 PM

views 25

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात रेणापूर इथं आज दुपारी सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत  आहे.    परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दमदार पावसामुळे जिल्ह्यातल्या  येलदरी, दुधना,  ढालेगाव तारुगव्हाण आणि मासोळी या  धरणांच्या पाणी साठ्यात चांगली भर पडली आहे. धरणातून  पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे  गोदावरी , पूर्णा, दुधना, करपरा या नद्यांना पूर आ...

September 2, 2024 7:50 PM

views 29

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात ४ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे. मराठवाड्यात हिंगोली, जालना आणि परभणीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत. १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आढावा घेतला असून, शेतीसह इतरही नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन प्रशासनानं त्वरित मदत करावी, असेही निर्देश दिले आहेत.    नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचं ...

September 1, 2024 7:16 PM

views 15

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. मध्य-महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, घाटमाथ्यावरदेखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारणत: ३ सप्टेंबर ते ५ सप्टें...

August 29, 2024 8:16 PM

views 12

३ सप्टेंबरला महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि भाषण पुरस्कारांचं वितरण

महाराष्ट्र विधान मंडळातल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या पुरस्कारांचं वितरण ३ सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. सन २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी हे पुरस्कार दिले जातील. यावेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन देखील करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि...

August 29, 2024 8:19 PM

views 25

‘महाराष्ट्र’ जीडीपीत सर्वाधिक वाटा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा सर्वाधिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. आपलं सरकार रात्रंदिवस काम करत असून घरात बसून सरकार चालवता नाही येत, त्यासाठी जनतेशी संपर्कात राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. राज्याची एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपलं सरकार उपाययोजना करतं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

August 28, 2024 1:57 PM

views 20

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार आणि बांधकाम सल्लागारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांनी काल मालवणला भेट देऊन पहाणी केली. या पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं २० ऑगस्ट रोजी नौदलाला पत्र लिहून पाऊस आणि खाऱ्या वाऱ्यांमुळं पुतळ्याची जोडणी गंजल्याची बाब अधोरेखित केली होती. दरम्यान या प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक दिली आहे.

August 28, 2024 1:42 PM

views 20

राज्यातल्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे; यात महाराष्ट्रातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेडके; तसंच कोल्हापुरातील स. म. लोहिया माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक सागर बगाडे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली...