December 31, 2024 8:12 PM

views 107

राज्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक

दहशतवाद विरोधी पथकानं डिसेंबर महिन्यात राज्यभरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातल्या १९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या चार दिवसांत विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि औरंगाबादमधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  ९ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तयार करून घेतली आहेत.

December 26, 2024 3:17 PM

views 14

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद महाराष्ट्रतल्या २ जवानांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या कामेरी इथले तर, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथले रहिवासी आहेत.  

December 25, 2024 9:30 AM

views 14

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करावं, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.  

December 22, 2024 7:06 PM

views 20

मंत्र्यांची महत्त्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही…

नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आज आपापल्या जिल्ह्यात पोचलेल्या मंत्र्यांनी महत्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली.    जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज अहिल्‍यानगरमधे जेष्‍ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्‍णा हजारे यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी सोपवल्यामुळे कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्‍या तुटीच...

December 22, 2024 3:24 PM

views 21

राज्यात हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे.    दरम्यान, सूर्याच्या उत्तरायणाला काल २१ डिसेंबरला प्रारंभ झाला. इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो. सूर्य काल मकरवृत्तावर असल्यानं कालचा डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे अकरा तासांचा तर, रात्र तेरा तासांची होती. उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंत...

December 22, 2024 3:09 PM

views 17

पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना ‘महाराष्ट्र’ देशात अग्रेसर – मंत्री अदिती तटकरे

भारत पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील, असं राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात २०२५-२६ च्या प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप, दृष्टिक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधांससह विविध विकास धोरणांबाबत शास...

December 18, 2024 3:15 PM

views 24

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर औचित्याचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे नितिन राऊत यांनी उपस्थित केला. मंत्री आशीष शेलार यांनी त्याला हरकत घेऊन राज्यसभेतले विषय या सभागृहात घेता येणार नाही, असं सांगितलं.    मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबाबतची चर्चा विधानपरिषदेत पु...

December 18, 2024 8:43 AM

views 59

नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ योजना योजना सुरू

ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, या उद्देशानं राज्य शासनानं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात १ हजार १०० कामं मंजूर असून ही कामं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

December 16, 2024 3:45 PM

views 22

विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहात ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.   पुरवणी मागण्यांमध्ये ३ हजार ५० कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री लाडकी ...

December 16, 2024 12:28 PM

views 117

नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला.   नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नव्या मंत्रिम...