May 25, 2025 3:51 PM

views 20

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे, तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड, पुणे, लातूर, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या पाऊस ओसरण्याचा अंदाज आहे. दरम्यान...

May 24, 2025 6:20 PM

views 45

गृहमंत्री अमित शाह उद्यापासून महाराष्ट्रच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून तीन दिवसांसाठी  महाराष्ट्राच्या  दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते नागपूरचा दौरा करणार असून २६ मे रोजी नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत माहिती दिली. २७ मे रोजी गृहमंत्री मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.

May 22, 2025 3:36 PM

views 16

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस

मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी  ५७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात ८० मिमी पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी घर-गोठे यांची पडझड होऊन ५ लाख ७१ हजार  ९५० रुपयांचं नुकसान झाल्याही माहिती आपत्ती विभागातून देण्यात आली.    दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झा...

May 22, 2025 3:30 PM

views 32

पावसाळ्यासाठी प्रशासन सज्ज, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पावसाळ्यात जीवीत आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवसांसह २४ तास सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते मोसमी पावासाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.   आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा अधिक पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी.  दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययो...

May 20, 2025 10:57 AM

views 28

भुजबळांची नाराजी दूर, मंत्रिपदाची घेणार शपथ

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आज त्यांचा शपथविधी होणार असून त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.  दरम्यान, ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगलं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसंच, त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

May 20, 2025 9:11 AM

views 15

अवकाळी पावसामुळे २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान

गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे राज्यभरात २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. यासंदर्भात लवकरच पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले. नाशिकमध्ये आयोजित खरीपपूर्व हंगाम बैठकीनंतर काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खरिप हंगामात खतं कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

May 19, 2025 8:19 PM

views 13

राज्यात येत्या रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात आजपासून येत्या रविवारी २५ मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २१ तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

May 19, 2025 6:57 PM

views 16

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.    रायगड जिल्ह्यात पनवेल इथं, तर ठाणे शहरात कोर्टनाका इथून तिरंगा रॅली काढली होती.     लातूर जिल्ह्यातही ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती.  यात्रेत माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.   धुळे शहरात आणि शिरपूर इथं, जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,  यवतमाळ जिल्ह्यात  पुसद इथं तिरंगा रॅली निघाली हो...

May 15, 2025 7:31 PM

views 24

बाजारांचा विकास करताना शेतकऱ्यांचं हित, अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय नामांकित बाजाराच्या अनुषंगानं राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित, तसंच बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भात विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पवार यांनी दिले.    कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित संपूर्ण पुनर्वसन आणि पर्यायी जमिन वाटपाबाबतही आज अजीत पवार यांच...

May 15, 2025 7:32 PM

views 73

महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यम प्रतिनिधीना सांगितलं. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असं ते म्हणाले.    मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यसरकार लौकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढीच्या उद्देशाने राज्यशास...