July 18, 2025 7:22 PM

views 13

अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नसल्याची उद्धव ठाकरेंची टीका

मुख्यमंत्र्यांचं भाषण ही स्वप्नरंजन गुटिका होती, या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना केली. लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं की नाही, त्यावर उपाययोजना केल्या की नाही, याचं उत्तर या अधिवेशनातून मिळालं नाही, असं ते म्हणाले.   सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवल्या तर ते आधीच्या सरकारकडे बोट दाखवतात, मात्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही ते म्हणाले. जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यान...

July 17, 2025 9:01 PM

views 22

राज्यात कायदा सुव्यवस्था विस्कळीत – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना केली. या वर्षी ३१ मेपर्यंत राज्यात १ लाख ६० हजाराहून जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात बलात्काराचे ३ हजार ५०६, घरगुती हिंसाचाराचे सुमारे ४ हजार, तर खुनाचे ९२४ गुन्हे घडल्याचं सांगून, यावर उत्तर कोण देणार, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.    वाढती सायबर गुन्हेगारी, अपुरं पोलीस दल, रखडलेली भर्ती, यात...

July 15, 2025 7:41 PM

views 15

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली.    रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून, सध्या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. तसंच  दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात गेल्या २४ तासांत  १४३ पूर्णांक ११ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली. जगबुडी, शास्त्री आणि कोदवली य...

July 15, 2025 7:41 PM

views 12

‘महाराष्ट्र’ हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल – मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला असून मुंबईत त्यांच्या पहिल्या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, तेव्हा ते बोलत होते.   मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात असल्याची माहितीही फडनवीस यांनी यावेळी दिली. ...

July 10, 2025 8:56 PM

views 131

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक आणलं असून याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही, याचा दुरुपयोग करायची मुभा कोणालाही मिळणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक मांडल्यानंतर त्यामागची सरकारची भूमिका त्यांनी मांडली. एकीकडे सशस्त्र माओवाद संपत असताना दुसरीकडे शहरी नक्षलवाद बोकाळत असून त्याला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचा कायदा करण्याची सूचना...

July 10, 2025 9:02 PM

views 7

विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान आमदार रोहित पवार यांनी या विधेयकातल्या 'कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना' या शब्दांवर आक्षेप घेत, कडवी उजवी विचारसरणी नसते का, असा सवाल विचारला. याऐवजी 'माओवादी संघटना' असा शब्द वापरावा, असं त्यांनी सुचवलं. या विधेयकाच्या जुन्या आणि नव्या मसुद्यात काही फार फरक नसून यातल्या अनेक व्याख्या मोघम असून याचा वापर गळचेपी करण्यासाठी होण्याची भीती व्यक्त केली.   सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सगळ्या संघटनांवर या कायद्यान्वये कारवाई करणार का,...

July 10, 2025 9:07 PM

views 13

गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करणार

    महाराष्ट्राला गणेशोत्सवाची शंभर वर्षांची समृद्ध परंपरा असून हा सण राज्य महोत्सव म्हणून हे सरकार घोषित करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

July 10, 2025 6:19 PM

views 20

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्याची विधानसभेत घोषणा

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा जयस्वाल यांनी आज विधानसभेत केली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे, अशी माहिती कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. विरोधी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर उपस्थित केलेल्या नियम २९३ अन्वये अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. शेतकर्‍यांना पीक विमा...

July 10, 2025 6:16 PM

views 6

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संदीप सांगवे यांचं निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची घोषणा

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांचं तत्काळ निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करायची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. आमदार संजय उपाध्याय यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. असे प्रकार फक्त मुंबईत नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी आढळून आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस, आयपीएस अधिकारी आणि या क्षेत्रातल्या तज्ञांच्या विशेष तपास पथकाची  स्थापन केली असून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही...

July 9, 2025 9:23 AM

views 11

राज्यातल्या ITI संस्थाच्या आधुनिकीकरणासाठी परदेशी पतसंस्थांद्वारे १२० कोटींची गुंतवणूक

बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन यांच्या दरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील पतसंस्था १२० कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिकमधील सहा निवडक ‘आयटीआय’ संस्थाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारप्रसंगी बोलताना सांगित...