August 10, 2025 6:09 PM August 10, 2025 6:09 PM

पुढचा आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज

पुढचा आठवडाभर राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. 

July 28, 2025 6:58 PM July 28, 2025 6:58 PM

views 16

राज्यात संपूर्ण आठवडाभर पावसाची शक्यता – हवामान विभाग

नाशिकमध्ये घाट परिसरांत गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरण ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे. आज सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून ६०३ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.   धुळे जिल्ह्यातही दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पांझरा, मालनगाव आणि जामखेडी हे मध्यम प्रकल्प पूर्ण भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिथून पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रम...

July 27, 2025 3:13 PM July 27, 2025 3:13 PM

views 12

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अजून कायम आहे. नद्यांचे प्रवाह वाढले असून धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी ओलांडली आहे.   पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   ठाणे जिल्ह्यात भातसा धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पिसे पम्पिंग स्टेशनच्या तलावात मोठ्या प्रमाणात चिखल, आणि झाडांच्या फांद्या साचल्या आहेत. तलावातला कचरा काढण्याचं काम...

July 7, 2025 3:29 PM July 7, 2025 3:29 PM

views 12

राज्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस सुरु असून, अनेक धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे. मुंबई शहराची तहान भागवणारं वैतरणा धरण ९५ टक्के भरलं असून, धरणातून विसर्ग सुरू आहे.   पालघर, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असून त्यादृष्टीनं प्रशासन सतर्क आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पावसामुळे धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून, कवडास धरणातूनही विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.   कोल्हापूर...

June 20, 2025 8:49 AM June 20, 2025 8:49 AM

views 11

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस, आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसानं पुणे, नाशिक, लातूर, सातारा आणि रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठयामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून काल दुपारपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला असून पुणे महापालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड, सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने अनेक नदी, नाले ओढे दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण...

June 17, 2025 3:44 PM June 17, 2025 3:44 PM

views 11

राज्यात पावसाची विश्रांती

गेले काही दिवस जोरदार हजेरी लावून आज पावसानं राज्यात काहिशी विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे. सर्व नद्यांची पाणीपातळीही कमी झाली आहे. आज दुपारी १२ वाजताच्या स्थितीनुसार, जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आली आहे.   मात्र, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई- गोवा महामार्गावर खेड तालुक्यात वळंजवडी इथं १०० मीटर परिसरात भेगा पडल्यानं या  वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.   सातारा जिल्ह्यात पाटण-चिपळूण महाम...

December 24, 2024 2:53 PM December 24, 2024 2:53 PM

views 8

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतल्या दक्षिणेकडच्या तुरळक भागांत, २७ डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी, तर २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाड्यातले उत्तरेकडचे जिल्हे आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ...

October 19, 2024 3:26 PM October 19, 2024 3:26 PM

views 7

राज्यात परतीच्या पावसाचा जोर

रत्नागिरी जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं असून जिल्ह्यात या महिन्यात सरासरी दीडशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १२९ टक्के पाऊस झालेला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भातपिकाचं नुकसान झालं असून, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. पावसामुळे आतापर्यंत केवळ ३५ टक्के क्षेत्रावरचीच कापणी होऊ शकली. देवरूख, राजापूरसह काही ठिकाणी वीज पडल्यामुळे पाच कामगार जखमी झाले आहेत. चिपळूणमधल्या परशुराम घाटात दोन दिवसांपूर्वी संरक्षक भिंत कोसळल्यानं मा...

October 1, 2024 3:36 PM October 1, 2024 3:36 PM

views 8

राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस

यंदाच्या हंगामात राज्यात १२६ टक्के पाऊस पडला. सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अहमदनगरमध्ये ४९ टक्के तर सांगलीत ४८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जळगाव, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी तर अमरावतीमध्ये २ टक्के कमी ...

August 30, 2024 7:35 PM August 30, 2024 7:35 PM

views 14

मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची हवामान विभागाची शक्यता

मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरु होतो. परंतु यंदा‘ला निना’च्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर खरीप पिकांना त्याचा फायदा होणार असून, खरीप लागवडीचं क्षेत्रही त्यामुळे वाढणार आहे.