September 30, 2025 9:10 PM

views 508

ओला दुष्काळ नियमात बसत नसला, तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.    राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करायला सुर...

September 30, 2025 4:56 PM

views 75

राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या माऊली प्रतिष्ठानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख १ हजार १११ रुपये दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यात नागुर इथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बाल...

September 29, 2025 3:16 PM

views 117

Maharashtra Flood : राज्यात पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्याने पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातून जवळपास तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. पुरामुळे नांदेड शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. नांदेड मह...