October 31, 2025 2:19 PM

views 156

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलपर्यंत या समितीच्या शिफारशी येतील, त्यानुसार पुढच्या तीन महिन्यात कर्जमाफी मिळेल, असंही ते म्हणाले.   अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात असून त्यापैकी ८ ...

March 25, 2025 7:17 PM

views 44

राज्यात शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे. अशा प्रकारचं हे देशातलं पहीलंच आयोजन असेल. या ॲग्री हॅकॅथॉनच्या नियोजनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या हॅकेथॉनच्या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वतशेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आणि जैविक खतांचा वैज्ञानिक उपयोग, शेतमालाची विक्रीसाखळी सुधारण्याकरता ई-मार्केटिंग अशा महत्वाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. या निमित्तानं युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञांना एकत्र आणून आधुनिक ...