August 23, 2024 7:03 PM
22
बंदबाबत न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री
बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र, त्यावर होत असलेलं राजकारण त्याही पेक्षा दुर्दैवी आहे. नेपाळमधल्या बस दुर्घटनेत जळगावमधल्या नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये आमदार आणि अधिकारी पाठवून तातड...