April 30, 2025 4:22 PM

views 17

कोलकाता इथं एका हॉटेलला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मध्य कोलकाता इथं एका हॉटेलला  काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आतापर्यंत १४ मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढले असून आगीचं  कारण अद्याप कळलेलं  नाही.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार  रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार केलं आहे, अशी माहिती क...