November 18, 2024 7:51 PM November 18, 2024 7:51 PM

views 14

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार पात्र ठरले आहेत.    झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यास...

November 12, 2024 8:27 PM November 12, 2024 8:27 PM

views 14

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान  होत आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी २२५ संवेदनशील मतदान केंद्रांसह एकूण १५ हजार ३४४ मतदान केंद्र उभारली आहेत. सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या तैनात आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी ५ या कालावधीत मतदान होईल. आसाम विधानसभेच्या पाच, बिहार विधानसभेच्या चार, कर्नाटकातल्या ३ जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आ...

November 11, 2024 10:30 AM November 11, 2024 10:30 AM

views 10

झारखंडमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

झारखंडमध्ये, राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित केले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राशी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितलं की त्यांचे हेत...

November 2, 2024 8:06 PM November 2, 2024 8:06 PM

views 10

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २९ गुन्हे दाखल

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासून आत्तापर्यंत राज्याच्या विविध भागांतून १३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बेकायदा वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २९ गुन्हे दाखल झाले आहेत. माओवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमांवर संयुक्त कारवाई सुरू आहे.