November 3, 2024 7:58 PM November 3, 2024 7:58 PM

views 10

झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर आदिवासी वगळता इतरांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचं भाजपाचं संकल्पपत्रात आश्वासन

झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करू, मात्र आदिवासींना त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवू असं आश्वासन भाजपानं दिलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं पक्षाचं संकल्प पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांचीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. संथाल परगणा भागातली बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कायदे बनवले जातील या लोकांनी आदिवासी महिलांसोबत विवाह करुन त्यांची जमीन हडपल्याचा दावा त्यांनी केला. कायदा झाल्यावर आदिवासींना त्यांच्या जमिनी पुन्हा दिल्या जातील. गोगो द...

October 29, 2024 1:30 PM October 29, 2024 1:30 PM

views 8

झारखंड विधानसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदानही येत्या २० नोव्हेंबरला होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी आतापर्यंत ६३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार असून १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतील. दरम्यान झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्याचवेळी अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.  याचाच एक भाग ...

October 28, 2024 1:44 PM October 28, 2024 1:44 PM

views 7

झारखंडमधे उमेदवारी अर्जांची छाननी सुरु

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. एकंदर ८०५ उमेदवारांनी या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे. १३ नोव्हेंबर रोजी या टप्प्यातल्या ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

October 22, 2024 8:35 PM October 22, 2024 8:35 PM

views 7

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.   झारखंडमधे पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या १३ नोव्हेंबरला होणार असून, या टप्प्यासाठी आतापर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी राबवण्य...

October 19, 2024 10:34 AM October 19, 2024 10:34 AM

views 15

झारखंड विधानसभेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAनं झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी युतीतील पक्षातील जागावाटप जाहीर केलं. झारखंड निवडणूकीसाठीचे सह-प्रभारी हेमंत बिस्वा शर्मा यांनी काल झारखंडमध्ये ही माहिती दिली. भाजपा 68 जागांवर, तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्ष 10 जागा, जमशेदपूर पश्चिम आणि तमार या दोन जागा जनता दल युनायटेडला आणि चतरा मधील एक जागा चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान इंडी-युतीचा जागांचा तिढा अद्याप कायम आहे.   यावेळी झारखंड मुक्ती मोर्चा काँग्र...

October 15, 2024 7:30 PM October 15, 2024 7:30 PM

views 10

झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान

झारखंड विधानसभेची तसंच १५ राज्यातल्या २ लोकसभा आणि ४८ विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकही केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात ८१ मतदारसंघात मतदान होईल आणि महाराष्ट्रासोबत २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल.    वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ वि...

October 3, 2024 1:28 PM October 3, 2024 1:28 PM

views 18

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

झारखंड येथे होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आजपासून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी हिमंत बिस्वा सरमा यांनी आज रांची इथे वार्ताहर प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. भाजपाचा जाहीरनामा टप्प्या टप्प्याने प्रसिद्ध केला जाईल. झारखंड राज्याच्या निर्मितीला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या जाहीरनाम्यातही २५ मुद्दे असतील. भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीपूर्वी भाजपाकडून राज्याच्या विकासासाठी १५० आश्वासनं जाहीर क...