December 4, 2025 1:28 PM December 4, 2025 1:28 PM

views 14

१५ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा, जलशक्ती मंत्र्यांची माहिती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सुरु केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १५ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना ही महिती दिली. चार कोटी नागरिकांना नळाद्वारे पेयजल पुरवण्याच्या योजनेचं काम सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या योजनांसाठी ३८ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचंही ते म्हणाले. 

September 12, 2024 9:03 AM September 12, 2024 9:03 AM

views 25

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

August 8, 2024 8:08 PM August 8, 2024 8:08 PM

views 12

देशातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी – मंत्री सी आर पाटील

सरकारनं जल जीवन मिशन अंतर्गत देशभरातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे असं पूरक प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं. या योजने अतंर्गत आतापर्यंत १५ कोटी कुटुंबांना नळ जोडणी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

July 23, 2024 8:48 PM July 23, 2024 8:48 PM

views 18

जल जीवन मोहिमेअंतर्गत १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी

जल जीवन मोहिमेनं देशभरातल्या ग्रामीण भागातल्या १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडण्या देऊन ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जल जीवन मोहिमेच्या माध्यमातून लोकांना शुद्ध पाणी मिळालं असून त्यांत जीवनमान सुधारलं असल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.२०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं २०१९ मध्ये जल जीवन मोहिमेची घोषणा करण्यात आली.