October 14, 2024 8:24 PM

views 14

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची टीका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मेक इन इंडिया या योजनेचा बोजवारा उडाला असून भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली असल्याचं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस कार्यकारणीच्या प्रसिद्धी माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या एक-दोन मोठ्या उद्योगसमूहांना पसंती मिळाल्यामुळे ही स्पर्धा थांबली असल्याचं ते म्हणाले.