June 27, 2025 1:57 PM

views 36

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिक मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. इराणमधून मायदेशी परतलेल्या ३ हजार ५९७ आणि इस्रायलमधून आलेल्या ८१८ व्यक्तींचा यात समावेश असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त ९ नेपाळी, ४ श्रीलंकेचे आणि एका भारतीय नागरिकाच्या इर...