November 8, 2024 8:20 PM

views 20

बिहारला गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी ४४६ विशेष रेल्वे गाड्या

नुकत्याच संपन्न झालेल्या छठ पूजा महोत्सवासाठी बिहारमध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीची सोय करण्यासाठी मध्य-पूर्व रेल्वे विभागानं रेल्वेच्या ४४६ फेऱ्यां सुरू केलं आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवलं जाणार आहे. या फेऱ्या आजपासून सुरू होणार असून आगामी  १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी यंदा गेल्या वर्षीपेक्षा ७० अधिक  गाड्यांची सोय करण्यात आली असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.  

November 8, 2024 10:35 AM

views 13

भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे 476 गाड्यांचं नियोजन केलं आहे.   दरम्यान मागच्या छत्तीस दिवसांमध्ये 4 हजार 521 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून 65 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.   या महिन्याच्या 4 तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे.

November 7, 2024 3:10 PM

views 11

भारतीय रेल्वे उद्यापासून १६४ विशेष गाड्या चालवणार

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे उद्यापासून १६४ विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे ४७६ गाड्यांचं नियोजन केले आहे. दरम्यान मागच्या छत्तीस दिवसांमध्ये ४ हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवल्या, ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. या महिन्याच्या ४ तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे.

November 4, 2024 9:23 AM

views 15

पुढील पाच ते सात वर्षांत देशातील रेल्वे प्रवासात अभूतपूर्व बदल होणार- रेल्वेमंत्री

नवीन तंत्रज्ञान, रेल्वेसाठी आधुनिक घटक आणि आगामी वर्षात पूर्ण हॉट असलेलं रेल्वेचं विद्युतीकरण यामुळे येत्या पाच ते सात वर्षांत देशातील रेल्वे प्रवासात अभूतपूर्व बदल होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल कोझिकोडमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.   अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत, 1 लाख कोटी रुपये खर्चून 1334 स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी 1100 स्थानकांमध्ये बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. देशातील स...

September 23, 2024 12:53 PM

views 21

केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी मुंबईहून भारत गौरव ट्रेन

केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी भारतीय रेल्वे भारत गौरव रेल्वे गाडी सुरू करणार आहे. आयआरसीटीसी आणि उत्तराखंड राज्य पर्यटन महामंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार. ही अकरा दिवसांची यात्रा असून, त्यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रिनाथ या तीर्थक्षेत्रांचा समावेश असेल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून तीन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता ही यात्रा सुरू होईल आणि त्याच स्थानकावर १३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता परत येईल. प्रवाशांना कल्याण, पुण...

September 5, 2024 7:00 PM

views 24

मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित

भारतीय रेल्वेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल म्हणून लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याच्या रेल्वे विकास मंडळाच्या वचनबद्धतेचं हे द्योतक आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात  आलं आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि कौशल्यवृद्धी होऊन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकारण्यात मोठा हातभा...

September 2, 2024 6:54 PM

views 18

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. महाराष्ट्रतले २ आणि मध्यप्रदेशातले ४ जिल्हे यातून जोडले जाणार आहे. या मार्गावर ३० रेल्वे स्थानकं असतील, यामुळं १ हजार गावांना आणि ३० लाख नागरिकांना याचा ...

August 9, 2024 3:54 PM

views 11

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

July 5, 2024 7:49 PM

views 27

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी ते बोलत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गाला सोयी देणे याकडे सरकारचा कल आहे, असं सांगत गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी याच उद्देशाने दोन अमृतभारत गाड्यांना हिरवा झ...

July 4, 2024 8:45 PM

views 24

भारतीय रेल्वेची १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना

भारतीय रेल्वेनं पुढच्या दोन वर्षांसाठी सुमारे १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना आखली आहे. त्यात ५३०० पेक्षा जास्त सामान्य डबे असतील, असं अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत सांगितलं. रेल्वेचे प्रवासी वाढत असून त्यामुळे डब्यांची आवश्यकताही वाढली आहे. त्यामुळे डब्यांचे उत्पादनही वाढवत असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.