December 31, 2025 12:49 PM

views 11

भारतीय रेल्वेचं सकलेशपूर-सुब्रमण्य रोड घाट विभागाचं विद्युतीकरण पूर्ण

भारतीय रेल्वेनं सकलेशपूर-सुब्रमण्य रोड घाट विभागाचं विद्युतीकरण पूर्ण करून एक मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. हा विभाग भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वात कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भूभागांपैकी एक आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे या प्रदेशात रेल्वे जोडणी, कार्यक्षमता तसंच शाश्वतता सुधारेल. आता वंदे भारत गाडी या मार्गावरून मंगळुरूपर्यंत धावू शकेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या यशाच्या परिणामाबाबत भाष्य करताना म्हंटलं आहे.

December 26, 2025 7:27 PM

views 46

मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट होणार

येत्या ५ वर्षात मुंबईसह एकूण ४८ मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या, अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत. त्यासाठी शहरी भागात नवीन टर्मिनलची उभारणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

December 14, 2025 6:52 PM

views 14

देशातल्या २५ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ९९ टक्के ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण

 भारतीय रेल्वेनं  देशातल्या २५ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या  सुमारे ९९ टक्के  ब्रॉडगेज जाळ्याचं  विद्युतीकरण पूर्ण केलं आहे.  २०१९ ते २०२५ या कालावधीत ३३ हजार किलोमीटरपेक्षा  अधिक मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आलं  आहे. या कालावधीत करण्यात आलेलं  एकूण विद्युतीकरण हे जर्मनीच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्क एवढं असून, स्वच्छ आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीच्या दिशेनं  देशानं  केलेल्या मोठ्या विस्ताराचं प्रतीक  असल्याचं  रेल्वे  मंत्रालयानं  स्पष्ट केलं  आहे.

December 7, 2025 1:44 PM

views 34

पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष रेल्वे गाड्या धावणार

गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वे सेवेने आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बेंगळुरू, पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर १४ विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते शकुरबस्ती अशा विविध मार्गांवर ७ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागात चेरलापल्ली ते शालीमार, सिंकदराबाद ते चेन्नई एगमोर आणि हैदराबाद त...

November 22, 2025 7:56 PM

views 24

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी टन झाली आहे. रेल्वेद्वारे आतापर्यंत ९ कोटी २० लाख टन सिमेंट वाहतूक झाली आहे. सिमेंट क्षेत्राचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेनं सुधारणेच्या दिशेनं अनेक पावलं उचलली आहेत. खतांची वाहतूक ४ कोटी २० लाख टन झाली आहे. एप्रिल त...

November 22, 2025 3:11 PM

views 33

भारतीय रेल्वेचा १ अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे.  या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी  टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख  टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी  टन झाली आहे.   रेल्वेद्वारे आतापर्यंत ९ कोटी २० लाख टन सिमेंट वाहतूक झाली आहे. सिमेंट क्षेत्राचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेनं सुधारणेच्या दिशेनं अनेक पावलं उचलली आहेत. खतांची वाहतूक ४ कोटी २० लाख टन झाली आहे.  &...

October 20, 2025 3:03 PM

views 41

१ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांचा विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवास

देशभरात गेल्या १९ दिवसांत १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सणासुदीच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात सर्वात जास्त म्हणजे १ हजार ९९८ मध्य रेल्वेकडून, त्याखालोखाल १ हजार ९१९ उत्तर रेल्वेकडून तर दीड हजार गाड्या पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आल्या होत्या. या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी १२ लाख रेल्वे कर्मचारी अव्याहत काम करत असल्याचं रेल्वे मंत्रालयान...

October 18, 2025 8:07 PM

views 20

रेल्वेसेवेबाबत दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई

समाज माध्यमांवरून रेल्वे सेवेबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या सणासुदीच्या काळात समाज माध्यमांवरच्या काही संकेतस्थळांवरून जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसारित झाल्यानं  प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याचं रेल्वेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.

October 14, 2025 8:18 PM

views 31

ग्राहकांना घरापर्यंत मालवाहतूक आणि पार्सल सेवा देणाऱ्या रेल्वे सेवांचं उद्घाटन

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ग्राहकांना घरापर्यंत मालवाहतूक आणि पार्सल सेवा देणाऱ्या रेल्वेच्या तीन नवीन सेवांचं उद्घाटन केलं. दिल्ली-कोलकाता मार्गावर ट्रान्झिट कंटेनर सेवा आणि मुंबई-कोलकाता रेल्वे पार्सल व्हॅन या दोन सेवांचा यात समावेश आहे. या सेवेद्वारे मालाची सुरक्षित हाताळणी होईल, आणि तो वेळेवर अपेक्षित स्थळी पोहोचण्याची खात्री मिळेल. तसंच वाहतुकीचा खर्च कमी होईल, असं वैष्णव यावेळी म्हणाले.

September 29, 2025 1:02 PM

views 52

SevaParv: भारतीय रेल्वेत झालेल्या सुधारणा

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवापर्व या मालिकेत भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेऊया...   गेल्या दशकभरात रेल्वेमधे मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि उच्च दर्जाचा अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. रेल्वेने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत जोडला गेला आहे.   सरकारने अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत जलद...