October 18, 2025 7:46 PM October 18, 2025 7:46 PM

views 163

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज

वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं.   जीएसटीतल्या सुधारणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

August 13, 2025 8:10 PM August 13, 2025 8:10 PM

views 9

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल – मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, तीन ते सहा महिन्यानंतर हे नुकसान भरून काढू असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आज व्यक्त केला. दागदागिने, कोळंबी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला सध्या या आयात शुल्काचा मोठा फटका बसतो आहे. पण सरकारला या नुकसानीची जाणीव आहे आणि या क्षेत्रातल्या उद्योगांशी सरकारनं चर्चा सुरू केली आहे, असं त्यांनी नमूद केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी...

June 11, 2025 8:23 PM June 11, 2025 8:23 PM

views 22

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६.३ % राहिल – जागतिक बँक

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहिल असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असण्याचा मान भारत या आर्थिक वर्षातही कायम ठेवेल, असं जागतिक बँकेनं म्हटलंय.    गेल्या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास दर कमी झाल्यानं देशाच्या आर्थिक वृद्धी दरात अपेक्षित वाढ झाली नाही. पण बांधकाम आणि सेवा क्षेत्राच्या विकासात वाढ झाली. ग्रामीण भागात मागणी वाढल्यानं कृषी क्षेत्राच्या वृद्धी दरात वाढ झाल्याचं जागतिक बँकेच्या ग्लोबल इक...

February 27, 2025 1:19 PM February 27, 2025 1:19 PM

views 13

जागतिक आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित माध्यमांशी संवाद कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. सध्याच्या काळात जागतिक पुरवठा साखळीत अडथळे उद्भवण्याचा धोका असून आता जगाचं भविष्य केवळ विकसित देशांच्या हाती राहिलेलं नाही, असं त्या म्हणाल्या. नवीन जग व्यापार आणि तंत्रज्ञानातून आकाराला येत असून भारताला त्यादृष्टीने धोरणं आखावी लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. येत्या काळात वाढत्या मध्यमवर्गाच...

August 17, 2024 2:23 PM August 17, 2024 2:23 PM

views 116

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार निर्माण करावे लागतील, असंही गोपीनाथ यांनी नमूद केलं. उत्पादनांचा व्यक्तिगत वापर पूर्वपदावर येण्याची आणि कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगला पाऊस होण्याची नाणेनिधीची अपेक्षा असल...

June 19, 2024 1:41 PM June 19, 2024 1:41 PM

views 44

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहेत, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मध्यप्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.   सिकलसेल आजाराचं निर्मूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून २०४७ मध्ये भारत पूर्णपणे सिकलसेलमुक्त होईल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तसंच आपल्या राज्यघटनेमध्ये आदिवासी समुदायासाठी अनेक विशेष तरतुदी असून त्याची पूर्तता करण्यात सरकारने कोणतीही कसर ठेव...