August 20, 2024 1:17 PM

views 27

भारत आणि जपानच्या मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत संवाद

भारत आणि जपानदरम्यान आज नवी दिल्लीत मंत्रिस्तरीय संवाद होणार आहे. भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तर जपानचे संरक्षणमंत्री किहारा मीनोरू आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री योको कामिकावा या संवादात सहभागी होतील. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी नव्या उपक्रमांविषयी चर्चा होईल आणि द्विपक्षीय सहकार्याचाही आढावा घेतला जाईल. भारत आणि जपानशी संबंधित धार्मिक आणि जागतिक प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीमुळे धोरणात्मक आणि जा...

August 17, 2024 8:24 PM

views 30

जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अनिश्चितता, भूराजकीय युद्ध, रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेच्या शिखर बैठकीत ते बोलत होते. दूरस्थ पद्धतीनं ही बैठक झाली. वातावरण बदल, आरोग्य, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेचा सामना या देशांना करावा लागतो आहे. दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद हे देखील समाजाला धोकादायक असल्याचं ते म्हणाले.  व्यापार आणि दळणवळणाला प्रोत्साहन, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांचा; ‘विकास प्रक्रीयेत’ वाढता सहभाग या...

August 16, 2024 8:46 PM

views 30

सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांची चर्चा

परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांनी आज चर्चा केली. व्हिएतनाम मधल्या हनोई इथं चौथी भारत-व्हिएतनाम सागरी सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाचं सहकार्य आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी आदी विषयांवर या चर्चेचा प्रामुख्यानं भर होता.

August 15, 2024 3:40 PM

views 22

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची वचनबद्धता या भाषणातून दिसते, असंही शाह म्हणाले. सशक्त भारत उभा करण्याची शपथ सर्व भारतीयांनी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

August 14, 2024 1:15 PM

views 22

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या बैठकीनंतर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर दहशतवादाच्या धोक्याविषयी यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज...

August 14, 2024 9:34 AM

views 18

भारत-अमेरिकेमध्ये लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढण्यासाठी सामंजस्य करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं अमेरिकेतल्या सरकारच्या लघु उद्योग प्रशासन विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे. दोन्ही देशांमधलं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं हा करार करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत हे सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं कौशल्याचं आदानप्रदान करण्याबाबतच्या मुद्द्याचाही या करारात समावेश आहे. महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी तसंच दोन्ही देशातल्या महिला संचलित लघु उद्योगांमधल्या व्यापारी भागीदारीला चालना देण्यासाठी या करारानुसार संयुक्त उपक्रम ...

August 12, 2024 2:45 PM

views 27

पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार सोहळ्यानं समारोप

पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा शानदार समारोप समारंभ काल स्टेड दे फ्रान्स मैदानावर पार पडला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश आणि यंदा ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात भारताचे ध्वजधारक होते. एक रौप्य आणि पाच कास्य अशा एकंदर सहा पदकांसह भारत पदकतालिकेत ७१व्या स्थानावर राहिला. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत ४८व्या स्थानी होता. ४० सुवर्णपदकांसह एकंदर १२६ पदकं पटकावलेल्या अमेरिकेनं अव्वल, ९१ पदकांसह चीनने दुसरं, तर ५३ पदकांसह ऑस्ट्रेलियानं तिसरं स्थान मिळवलं. पॅ...

August 9, 2024 3:41 PM

views 15

देशाच्या लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ

देशाच्या खनिज उत्पादनात वाढ झाली असून २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. चुनखडीच्या उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. तर चुनखडीचं उत्पादन साडेचारशे मेट्रिक टन झालं होतं. मँगनीज उत्पादन ११ टक्क्यांनी वाढलं आहे.  

August 9, 2024 10:25 AM

views 27

भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल हॉकी इंडियाकडून हॉकी संघाला बक्षीस जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कास्य पदक पटकावलं आहे. काल झालेल्या कास्य पदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे.   ऑलिम्पिक मध्ये भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल भारताच्या पुरुष हॉकी संघाला हॉकी इंडियाने बक्षीस जाहीर केल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये तर संघाच्या सहकार...

August 8, 2024 7:33 PM

views 37

भारत २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल – नीती आयोग

देशाचा विकास दर सरासरी ५ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज लक्षात घेता, भारत, २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम-उत्पन्न गटातला, तर २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक परिषदेत डॉ. वीरमणी यांनी आज बीजभाषण दिलं. त्यावेळी ते बोलत होते. ‘व्यत्ययांशी जुळवून घेताना: लवचिकता, शाश्वतता आणि नवोन्मेष’, ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.   उत्पन्नाची पातळी वाढताना, भारतानं पिण्याचं पाणी, स्व...