May 22, 2025 3:10 PM

views 21

FIH हॉकी स्पर्धेच्या युरोप दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा

एफआयएच हॉकी स्पर्धेच्या युरोप दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा आज करण्यात आली. २४ खेळाडूंच्या या संघाचं नेतृ़त्व हरमनप्रीत करणार आहे. ७ जून ते २२ जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. ७ आणि ९ जूनला भारताचा सामना नेदरलँडच्या संघाशी होणार आहे. त्यानंतर १४ आणि १५ जून रोजी ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघाची लढत होईल. 

May 22, 2025 2:49 PM

views 29

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याचं निलंबन

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं असून त्यांना २४ तासाच्या आत पाकिस्तान सोडायलाही सांगण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांची वर्तणूक पदाला साजेशी नसल्याचं कारण देत हे आदेश देण्यात आल्याचं पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. या आधी भारतानंही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला २४ तासाच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले होते.

May 20, 2025 1:23 PM

views 25

अफगाणी नागरिकांना भारताची मदत

पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं. भारतानं या कुटुंबांना ११ प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत. काबुलच्या स्थलांतरीत निदेशालयातर्फे या मदतीचं वाटप करण्यात आलं. या मदतीबद्दल अफगाणीस्ताननं भारताचे आभार मानले असून इतर देशांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

May 20, 2025 9:59 AM

views 27

पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेदरलँडचं कौतुक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांची काल भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असलेले संबंध दृढ करण्यासंदर्भात यावेळी व्यापक चर्चा झाली. असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याचा नेदरलँडनं तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईला दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी नेदरलँडसचं कौतुक केलं.

May 15, 2025 7:44 PM

views 26

भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतर कुणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नसल्याची परराष्ट्रव्यवहार मंत्र्यांची स्पष्टोक्ती

भारत आणि पाकिस्तानदरम्यान इतर कोणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जय शंकर यांनी केलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीयच होईल , ती देखील काश्मीरमधे पाकिस्तानने केलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरच असं त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात भारताच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही आणि या मुद्यावर कायम देशभरात सहमती आहे असं ते म्हणाले.   पाकिस्तानने दहशतवाद्यांचे आसरे ...

May 15, 2025 4:12 PM

views 2

भारतीय प्रतिनिधी मंडळाने घेतली संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळानं न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी व्‍लादिमीर व्होरोन्कोव्ह आणि नतालिया घेरमन यांनी सुरक्षा परिषदेचा दहशतवाद विरोधी प्रस्ताव आणि संयुक्त राष्ट्रांचं जागतिक दहशतवाद विरोधी धोरण लागू करण्यात सहकार्य वाढवण्यावर भर दिला.    भारताच्या प्रतिनिधी मंडळानं यावेळी दहशतवादी गट आणि त्यांच्याश...

May 14, 2025 7:44 PM

views 18

पाकिस्तान पुरस्कृत अपप्रचाराला हातभार लावणाऱ्या ३ खात्यांवर भारताची बंदी

एक्स समाजमाध्यमावर पाकिस्तान पुरस्कृत अपप्रचाराला हातभार लावणाऱ्या ३ खात्यांवर भारताने बंदी घातली आहे. त्यात चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या मालकीचं ग्लोबल टाईम्स हे दैनिक, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनातली झिन्हुआ वृत्त संस्था आणि टीआरटी वर्ल्ड या तुर्कियेच्या राष्ट्रीय प्रसारण संस्थेच्या खात्यांचा समावेश आहे.

May 13, 2025 1:22 PM

views 18

गोळीबार न करण्यावर भारत-पाकिस्तानमध्ये सहमती

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सैनिकी कारवाई महासंचालक स्तरावर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंच्या सैन्याकडून बंदूकीची एकही गोळी झाडली जाता कामा नये, तसंच एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक कारवाई केली जाऊ नये यावर सहमती झाल्याचं भारतीय लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सीमेवर सैन्य कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यालाही दोन्ही देशांच्या लष्करानं संमती दर्शवली आहे. दरम्यान सीमावर्ती भागात एवढ्यात शत्रूचे कोणतेही ड्रोन आढळल्याची माहिती नाही. परिस्थिती शांत आणि पूर्ण नियंत्रणात आहे, असं भारतीय ...

May 10, 2025 8:31 PM

views 17

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने तीन पदकं जिंकली

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज तीन पदकं जिंकली. पुरुष कंपाउंड स्पर्धेत अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि ऋषभ यादव यांच्या संघानं अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या संघाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं.   महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम, मधुरा धामणगावकर आणि चिकिथा तानिपर्थी यांच्या संघानं अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकलं. मेक्सिकोच्या संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं.

May 10, 2025 8:45 PM

views 36

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती

भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सैनिकी कारवाई महासंचालकांनी आज दुपारी भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी करवाया थांबवण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी आज निवेदनात दिली. दरम्यान, भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध नेहमीच कणखर भूमिक...