August 15, 2025 9:49 AM August 15, 2025 9:49 AM

views 8

राष्ट्रपतींचं देशवासीयांना संबोधन

युवा, महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृत काळात आघाडीवर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासीयांना संबोधित केलं. सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम तसंच समग्र आर्थिक विकासामुळं २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांचं आयुष्य, व्यापार-उद्योग सहज-सोपे व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असं राष्ट्रपतींनी यावेळी नम...

August 14, 2025 8:05 PM August 14, 2025 8:05 PM

views 11

सैन्य दलांतल्या ४०० हून अधिक जणांचा राष्ट्रपतींकडून गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना १२७ शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि २९० जणांना विशेष गौरव केला. यात ४ किर्ती चक्रं, १५ वीर चक्रं, १६ शौर्य चक्रं, ६० सेना पदकं, ६ नौसेना पदकं, २६ वायू सेना पदकं, ७ सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, ९ उत्तम युद्ध सेवा पदकं आणि २४ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.    लष्करातले कॅप्टन लालरिनावमा सायलो, लेफ्टनंट शशांक तिवारी, लान्स नायक मीनातची सुंदरम आणि शिपाई जंजल प्रवीण प्रभाकर या...

August 14, 2025 8:08 PM August 14, 2025 8:08 PM

views 6

स्वातंत्र्य दिनाची सर्वत्र जय्यत तयारी

देश एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून नव्या आकांक्षा, नवी स्वप्नं आणि नव्या आशा यांचा जागर उद्या साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील आणि किल्ल्याच्या तटावरून देशाला संबोधित करतील.   स्वातंत्र्य दिनाची यंदाची मध्यवर्ती संकल्पना ‘नवा भारत’ अशी आहे. यंदा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन सिंदूर...

August 14, 2025 7:02 PM August 14, 2025 7:02 PM

views 14

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात तिरंगा यात्रा निघत आहेत. तिरंगा यात्रेसोबतच विविध कार्यक्रम आणि उपक्रम राज्यभरात आज आयोजित करण्यात आले. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या मुख्य उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेतर्फे आज तिरंगा सन्मान शपथ कार्यक्रम पार पडला. कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बीड शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली.   धुळे शहरातून १ हजार १११ फूट लांब तिरंगा ध्वजासह पदयात्रा काढण्यात आली. पाल...

August 14, 2025 6:52 PM August 14, 2025 6:52 PM

views 8

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या पोलीस, अग्निशमन कर्मचारी होमगार्डचा गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या ४९, अग्निशमन सेवेतल्या ८, होमगार्ड ५, तर सुधारात्मक सेवेतल्या ८ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस सेवेतल्या अनिल कुंभारे, प्रमोदकुमार शेवाळे, बाळासाहेब भालचीम, संजय चांदखेडे, नेताजी बंडगर, मनोहर महाका यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. सुरेश तेलामी यांना मरणोत्तर शौर्य ...

August 15, 2024 3:44 PM August 15, 2024 3:44 PM

views 5

प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला – नाना पटोले

शेतकरी, कामगार आणि जवानांनी हा देश उभा केला असून देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन मुख्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला तसंच नेहरूंनी यासाठी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला याची आठवणही पटोले यांनी करून दिली. 

August 14, 2024 8:12 PM August 14, 2024 8:12 PM

views 13

देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या प्रगतीचा आढावा

राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यासंदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दि...

August 13, 2024 8:10 PM August 13, 2024 8:10 PM

views 3

स्वातंत्र्य दिनासाठी लाल किल्ल्यावर ४०० पंचायती राज प्रतिनिधी आमंत्रित

केंद्र सरकारने येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. त्यात महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वाविषयीच्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. पंचायतींमधल्या महिला लोकप्रतिनिधींसमोरची आव्हानं आणि स्थानिक प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवणे या धोरणांवर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री राजी...