September 29, 2025 9:18 AM

views 32

आयर्लंडमध्ये भारतीय दूतावासाद्वारे भारत दौडचं आयोजन

आइसलँडमधील भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या विकसित भारत दौडमध्ये भारतीय नागरिकांनी भाग घेतला. आइसलँडमधील भारताचे राजदूत आर. रवींद्र यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केलं आणि त्यांना विकसित भारताची प्रतिज्ञा दिली. स्वावलंबी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी परदेशातील भारतियांना योगदानार्थ प्रेरित करण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली असल्याचं रेकजाविकमधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.