October 26, 2025 8:18 PM

views 168

Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आहे. बांगला देशाच्या तेराव्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला.    या स्पर्धेत गुणतालिकेत भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे.

October 16, 2025 8:19 PM

views 44

ICC Women’s Cricket : बांगलादेशाचं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्‍व चषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशानं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. आणि निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून १९८ धावा केल्या.    या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली आणि फोएबे लिचफिल्ड यांनी फटकेबाजी करत अर्धशतकं पूर्ण केली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २१ षटकात बिनबाद १५५ धावा झाल्या होत्या. या स्पर...