February 21, 2025 2:40 PM February 21, 2025 2:40 PM

views 7

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानात कराची इथल्या मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील सामना होणार आहे.भारतानं काल बांगलादेशवर ६ गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली.   बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२९ धावांचं आव्हान ठेवलं; त्याला प्रत्युत्तर देताना ४७ व्या षटकातच भारतीय संघानं विजय साकार केला. शुभमन गिलनं शतकी खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रोहित शर्मानं ४१ तर विराट कोहलीनं २२ धावा काढल्या.

February 21, 2025 9:24 AM February 21, 2025 9:24 AM

views 11

ICC क्रिकेट : स्पर्धेत बांगलादेशवर मात करत भारताचा विजय

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर 6 गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२९ धावांचं आव्हान ठेवलं; त्याला प्रत्युत्तर देताना ४७व्या षटकातच भारतीय संघानं विजय साकार केला. शुभमन गिलनं शतकी खेळी केली.   त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रोहित शर्मानं 41 तर विराट कोहलीनं 22 धावा काढल्या. आज पाकिस्तानच्या कराची इथल्या मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील सामना होणार आहे.

February 15, 2025 8:38 PM February 15, 2025 8:38 PM

views 15

ICC Champions Trophy: भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना

आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातला भारतीय क्रिकेट संघ आज दुबईला रवाना झाला. या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून, २० फेब्रुवारीला भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरोधात होणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि २ मार्चला न्यूझीलंडविरोधात भारताची लढत होणार आहे. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम लढत ९ मार्चला होणार आहे.  भारतानं याआधी दोन वेळा या स्पर्धेचं विजेतपद आणि दोन वेळा उपविजेतेपद पटकावलं आहे.

December 23, 2024 8:07 PM December 23, 2024 8:07 PM

views 8

पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ICC चँपियन्स करंडक 2025 साठी संयुक्त अरब अमिरात देशाची निवड

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी,तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळले जाणार आहेत. त्या देशात कोणत्या ठिकाणी हे सामने होणार हे पाकिस्तान क्रिकेट मंडळानं स्पष्ट केलं नसलं, तरी दुबईमध्ये हे सामने होतील, अशी शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या ...