July 31, 2024 7:08 PM

views 37

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यांचं आरक्षण बसस्थानकावर, किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.   गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थान...

July 19, 2024 8:07 PM

views 26

कोकणात गणपतीक जाऊचा? रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ, तसंच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.           

July 19, 2024 3:20 PM

views 28

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ,तसेच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आ