January 17, 2025 8:47 PM

views 12

अन्न पदार्थांच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना

अन्न पदार्थांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ते उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा डाळी आणि कांद्याचं उत्पादन वाढेल,  असा अंदाजही ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने वर्तवला आहे.