March 8, 2025 8:43 PM March 8, 2025 8:43 PM

views 7

बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगिकारले पाहिजेत-सीतारामन

जागतिक स्तरावर बदल घडत असताना बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगिकारले पाहिजेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होत्या. बँकिंग व्यवसायावर कठोर नियंत्रण असलं तरी स्टेट बँकेनं आपली आघाडी कायम राखण्यात यश मिळवल्याचं त्या म्हणाल्या. सेवेबाबत ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना बँकेनं व्यक्तिगत वितरण व्यवस्थेत परिवर्तन घडवल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

February 17, 2025 9:10 PM February 17, 2025 9:10 PM

views 12

MSME साठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गैरव्यवहारांमुळं बँक खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम काढता येईल. वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतल्या घोटाळ्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. सध्या DICGC मार्फत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतात.     वीमा एजंटकडून काही वेळा ग्राहकांना फसवून वीमा योजनेची...

February 11, 2025 8:04 PM February 11, 2025 8:04 PM

views 9

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सर्वाधिक ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक राहील, यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करेल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारकडून घेतलं जाणारं ९९ टक्के कर्ज हे भांडवल निर्मितीसाठी खर्च होत आहे. चलनवाढीचा दर २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यावर सरकारचा भर आहे, असं त्या म्हणाल्या. रुपयाच्या घसरणीला जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतले अनेक घटक कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. दक्षिण कोरिया, इ...

February 8, 2025 8:12 PM February 8, 2025 8:12 PM

views 7

नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार

येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणलं जाईल, त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आर्थिक विकासाकरता आणि महागाईच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत, असं सीतारामन यांनी सांगितलं. महागाई असो किंवा विकासाचा मुद्दा असो चलनविषयक धोरण आणि वित...

February 3, 2025 10:27 AM February 3, 2025 10:27 AM

views 2

खोल समुद्रातल्या संशोधनासाठी अर्थसंकल्पात सहाशे कोटी रुपयांची तरतूद

भारताच्या खोल समुद्रातील महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहाशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे समुद्रात सहा हजार मीटर खोल संशोधन करण्यासाठी, विशेषत्वाने तयार कऱण्यात आलेल्या पाणबुडी पाठवण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. चेन्नईतल्या राष्ट्रीय सागरी उद्योग संस्थेने ही पाणबुडी तयार केली आहे. या वर्षी ही पाणबुडी 500 मीटर खोल पाठवून संशोधन करण्यात येईल. पुढल्या वर्षी ती 6 हजार मीटर खोलपर्यंत पाठवण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न असेल. त्याशिवाय पृथ्वी विज्ञान ...

February 2, 2025 8:13 PM February 2, 2025 8:13 PM

views 10

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्याकरता करांमधे सवलत द्यायचं उद्दिष्ट होतं, असं त्या म्हणाल्या. करआकारणी सुलभ आणि सोपी असाव...

February 2, 2025 3:40 PM February 2, 2025 3:40 PM

views 13

यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना करांमधे सवलत देण्याचं उद्दिष्ट-सीतारामन

देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून त्यांच्याकरता करांमधे सवलत देण्याचं उद्दिष्ट यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना होतं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली. करआकारणी सुलभ आणि सोपी असावी, त्यामुळे करभरणा प्रामाणिकपणे करण्याला प्रोत्साहन मिळतं. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकन डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भ...

February 1, 2025 2:00 PM February 1, 2025 2:00 PM

views 8

कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणे, कृत्रिम दागिन्यांना करसवलती मिळाल्यानं स्वस्त होणार

अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या ३६ औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे. याशिवाय ६ जीवनरक्षक औषधांवरचं ५ टक्के सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावे लागेल. याशिवाय सुरीमी, कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग, PCB चे भाग, मोबाइलचे सेन्सर, LED आणि LCD चे भाग, दुचाकी यांच्यावरही आयात शुल्कात सवलत दिल्यानं या वस्तू स्वस्त होतील. मार्बल, ग्रॅनाइट, पादत्राणे, PVC बॅनर, सौर बॅटरी, लोह आणि स्टीलच्या काही वस्तू, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर, कृत्रिम दागिने, दु...

February 1, 2025 2:00 PM February 1, 2025 2:00 PM

views 6

आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा

देशभरातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं. उत्पादन वाढवणं, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणं, पंचायत आणि गट स्तरावर साठवणुकीची क्षमता वाढवणं, सिंचन सुविधा सुधारणं, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. याचा लाभ दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे साडे सात कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छिमार आणि दूध उत्पादक शेतकऱ...

February 1, 2025 1:55 PM February 1, 2025 1:55 PM

views 8

१२ लाखापर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त, त्यापुढील उत्पन्नावरच्या करांच्या दरातही कपात

पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळं १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यमवर्गासाठी खूषखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना ७५ हजार रुपयांचं standard deduction मिळत असल्यानं त्यांना पावणे १३ लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही.   नवीन कर रचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या. त्यानुसार आता ४ लाख रुपयांपर्यंत उत...