June 28, 2024 5:48 PM June 28, 2024 5:48 PM

views 22

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ची घोषणा

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे ७ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या  शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली. साडे 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाईल. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.    गाव तेथे गोदाम योजनेची घोषणा सरकारनं केली असून यात पहिल्या ट...

June 25, 2024 7:02 PM June 25, 2024 7:02 PM

views 15

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचं वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करावा,  कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे ...

June 25, 2024 6:55 PM June 25, 2024 6:55 PM

views 15

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३ व्या बैठकीत बोलत होते. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.    पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातल्या जिल्हा सहकारी बँका, तसंच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या बळकट...

June 20, 2024 7:39 PM June 20, 2024 7:39 PM

views 12

शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी डीएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागाने राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. डीएपी खतानंतर एसएसपी या खताला सर्वाधिक मागणी असून यात १६ टक्के स्फुरदसह इतर अन्नद्रव्ये आढळून येतात. तसंच डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोणी एसएसपी खतांचा वापर चांगला पर्याय असल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे.

June 16, 2024 8:05 PM June 16, 2024 8:05 PM

views 40

कापूस, सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या मूल्यसाखळीला चालना देण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलच्या mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.   चालु वर्षातल्या खरीप हंगामासाठी नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर मेटाल्डीहाईड सोयाबीनसाठी २३ जूनपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. या...