February 13, 2025 1:26 PM

views 37

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारताने ३-० नं जिंकली

इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारताने ३-० अशी जिंकली आहे. अहमदाबाद इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने  इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव करून मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताच्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३५ व्या षटकांत २१४ धावांवर आटोपला.  इंग्लंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. टॉम बँटन यानं केलेल्या ३८ धावा ही त्यांच्या खेळाडूंची सर्वोच्च धावसंख्या होती. भारताच्या अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, हार्दिंक पंड्या आणि  हर्ष...