August 23, 2024 7:25 PM August 23, 2024 7:25 PM

views 10

रत्नागिरीतल्या ३११ गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबद्द्लची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश आहे. या अहवालानुसार चिपळूणमधल्या ४४, खेडमधल्या ८५, खेडमधल्या २५, लांजा तालुक्यातल्या ५०, राजापूरमधल्या ५१ आणि संगमेश्वर तालुक्यातल्या ८१ गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येत आहेत. स्थानिक नागरिकांनी आपल्या हरकती ६० दिवसांमध्ये मंत्रालयाकडे कळवाव्यात असं मंत्रालयाकडून कळवण्यात आलं आहे.