October 25, 2024 5:24 PM

views 11

गेल्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं – सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

गेल्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं आहे, असं प्रतिपादन विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय लोकन्यायालय म्हणून काम करतं असं उदाहरण जगात विरळच आहे असं ते म्हणाले. ही विशेष मुलाखत आज रात्री साडे नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.