June 1, 2025 4:45 PM June 1, 2025 4:45 PM

views 10

डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती ठरेल असा विश्वास-अजित पवार

शेती म्हणजे संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं देशात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं उदघाटन, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते.    शेतकऱ्यांच्या कष्टाला कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसंच  न...

September 23, 2024 7:50 PM September 23, 2024 7:50 PM

views 7

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. दिवाळी सण, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून ही तारीख ठरवल्याचं त्यांनी सांगितलं.

August 29, 2024 7:12 PM August 29, 2024 7:12 PM

views 11

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही, कारवाई होणारच, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.