March 31, 2025 6:31 PM
18
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक
दिल्ली एनसीआर भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अंमली पदार्थ तस्करीविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी या टोळीला पकडलं असून या टोळीकडून २७ कोटी रुपयांहून जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या यशाबद्दल शहा यांनी कारवाई करणाऱ्या दलांचं कौतुक केलं आहे.