October 18, 2024 3:51 PM

views 13

युद्धाच्या नवनवीन प्रकारांमुळे संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं उभी राहत असल्यानं युवक आणि खासगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा-संरक्षण मंत्री

युद्धाच्या नवनवीन प्रकारांमुळे संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं उभी राहत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे आयोजित डेअर टू ड्रीम फाईव्ह पॉईंट झीरो या नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ड्रोन, सायबर युद्ध, जैविक शस्त्र, असे नवनवीन मार्ग युद्धासाठी वापरले जातात, अंतराळातली संरक्षण व्यवस्था हे देखील नवीन आव्हान असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर युवकांनी आणि खासगी क्षेत्रानं संरक्षण क्षेत्रात पुढाकार घ...

September 11, 2024 6:42 PM

views 20

देशाच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमाप्रांत विकासविषयक परिषदेत ते बोलत होते. देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. सीमाभागात गेली १० वर्षात ८ हजार ५०० किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आणि ४०० हुन अधिक कायमस्वरूपी सेतू बांधण्यात आल्याच...

September 8, 2024 7:51 PM

views 12

भाजपा सत्तेत असेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित केलं जाणार नाही – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत जम्मू काश्मीरमधलं ३७० कलम पुनर्स्थापित केलं जाणार नाही, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. रामबान जिल्ह्यात ते आज प्रचारसभेला संबोधित करत होते. केंद्रशासीत प्रदेशात आहे तीच स्थिती कायम ठेवण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला, तसंच जम्मू काश्मीर मध्ये होत असलेल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष लागल्याचंही ते म्हणाले. ३७० कलम काढून टाकल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचंही राज...