June 27, 2025 4:12 PM

views 16

भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारताचा कायम भर – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायम भर दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर ताणले गेलेले दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य व्हावेत, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं. &...

June 27, 2025 2:06 PM

views 37

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द राखण्याची गरज अधोरेखित करत परस्पर मतभेद कमी करून सीमा वाद ...

May 12, 2025 9:41 AM

views 15

ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या इच्छाशक्तीचं प्रतीक – संरक्षणमंत्री

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नसून ती देशाची राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक ईच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ही कारवाई दहशतावादाविरोधातल्या भारताच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं तसंच लष्करी क्षमता आणि दृढनिश्चयाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. लखनऊ इथं ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं उद्घाटन काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून झालं; त्यावेळी ते बोलत होते.

April 17, 2025 2:43 PM

views 24

भारताचे संरक्षण क्षेत्र स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे: संरक्षण मंत्री

भारताचं संरक्षण क्षेत्र आता स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून निर्यात क्षमताही वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका संरक्षणविषयक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. मोदी सरकारने सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर नेहमीच भर दिला आहे, असं ते म्हणाले. संरक्षण क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने २०२५ हे वर्ष ‘सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत लष्करी क्षेत्रातली तांत्रिक प्रगती, धोरणा...