October 2, 2025 6:10 PM October 2, 2025 6:10 PM
106
बीड जिल्ह्यात सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं – पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, तसंच गोपीनाथ मुंडे यांनीही हाच वारसा पुढे नेला. त्यामुळे जिल्ह्यातील जातीपातीचं राजकारण थांबलं पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जाती आजही मागास आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणात वाटा पडणं योग्य नाही. ...