August 31, 2024 8:19 PM

views 29

व्हिएतनाममध्ये सायबर घोटाळे करणाऱ्यांच्या ताब्यातून ४७ भारतीयांची सुटका

व्हिएतनाममध्ये लाओस इथल्या सायबरकेंद्रामध्ये अडकलेल्या सत्तेचाळीस भारतीयांना भारतीय दूतावासाने सोडवलं आहे. ही सायबर केंद्रे म्हणजे सायबर घोटाळे करणारी केंद्रे होती.  बोकिओ परगण्यातल्या  गोल्डन ट्रँगल सेझमध्ये  ही केंद्रे  सुरु होती. भारतीय दूतावासाने त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माहिती दिली आहे. या सेझ मधल्या बेकायदेशीर कृत्यांचा छडा लावल्यावर यापैकी २९ जणांना भारतीय दूतावासाच्या स्वाधीन करण्यात आलं तर १८ जणांनी स्वतः दूतावासाशी संपर्क साधला. भारतीय राजदूतांनी त्यांची भेट घेऊन त...