November 8, 2025 7:09 PM November 8, 2025 7:09 PM

views 38

नवी मुंबईत सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीनं  आतापर्यंत सुमारे ८४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचं  उघड  झालं आहे. यासाठी या टोळीनं देशभरातल्या विविध बँकांची तब्बल ८८६ खाती वापरली होती. पोलिसांच्या कारवाईत ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुकं आणि एक चारचाकी असा  १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

April 2, 2025 11:24 AM April 2, 2025 11:24 AM

views 17

महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रूपरेषा जारी

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रूपरेषा जारी केली आहे. हे महामंडळ स्थापन केल्याने नगरिकांचं तसंच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचं सायबर गुन्ह्यापासून आणि संबंधित धोक्यांपासून संरक्षण होईल असा दावा राज्य सरकारने केला आहे.   यापूर्वी सायबर गुन्हे विभाग राज्य पोलिसांच्या अधीन होता. यासाठी महामंडळ स्थापन करण्याला गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

March 12, 2025 8:14 PM March 12, 2025 8:14 PM

views 11

डिजिटल गुन्ह्यांमध्ये तिपटीने वाढ

२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत देशात डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आहे, अशी माहिती आज राज्यसभेत गृहराज्यमंत्री बंडी संजयकुमार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. २०२२मध्ये सुमारे ४० हजार गुन्हे नोंदवले गेले होते. त्यात ९१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली होती.   २०२४मध्ये सुमारे सव्वा लाख गुन्ह्यांची नोंद झाली. या कालावधी फसवणुकीची रक्कम २१ पटींनी वाढून सुमारे १ हजार ९३५ कोटी ५१ लाख रुपये इतकी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यं...

March 6, 2025 5:48 PM March 6, 2025 5:48 PM

views 10

वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट-एचएसआरपीच्या नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र परिवहन विभागानं एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपर्यंत एचएसआरपी बसवणं बंधनकारक केलं आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक दिली आहे. एचएसआरपी बदलण्यासाठी वाहनधारकांकडून पैसे गोळा करून फसवणूक करण्यासाठी चोरट्यांनी अशा लिंक तयार केल्या आहे...

January 27, 2025 1:29 PM January 27, 2025 1:29 PM

views 6

झारखंडमध्ये ६ सायबर गुन्हेगारांना अटक

झारखंडमधल्या जामतारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ सायबर गुन्हेगारांना अटक केली असून एक आंतरराज्य टोळी उघडकीस आणली आहे. सरकारी बँकांमधल्या खात्याच्या माहितीचा दुरुपयोग करून १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक या प्रकरणी झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एहतेशाम वकारिब यांनी आज दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी या टोळीकडून १४ मोबाईल, २३ सीम कार्ड, १० एटीएम, १ लॅपटॉप, २ दुचाक्या, १ ड्रोन कॅमेरा यासह एक लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. 

September 11, 2024 2:38 PM September 11, 2024 2:38 PM

views 9

सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी येत्या ५वर्षांत ५हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असून केंद्राने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी येत्या पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंट-आय फोर सी-च्या अर्थात भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या पहिल्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात दिली. सायबर गुन्ह्यांना सीमा नसल्यामुळे या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येण्याचं आवाहन शहा यांनी केलं.