June 8, 2025 7:55 PM

views 36

मणिपूरमधल्या पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

मणिपूरमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मैतेई समुदायाच्या अरंबाई टेंगगोल या कट्टरतावादी संघटनेच्या सदस्यांना झालेल्या अटकेनंतर या भागात हिंसक निदर्शनं झाली होती. त्यामुळे इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये आधी पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता संचारबंदी आणि जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या पाचही जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दलांची पथकं तैनात करण्यात आली आहे...

August 7, 2024 1:32 PM

views 23

फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू

बांगलादेशातून होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्य सरकारने फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले.   बंदुक, तलवार, काठी, दगड किवा कुठलंही धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. जिरिबाम जिल्ह्यात जिरिबाम नगरपरिषद आणि बोरोबेका उप विभागाच्या हद्दीत सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.

July 20, 2024 3:15 PM

views 22

बांगलादेशात हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लष्कर तैनात करण्यात आलं आहे. बांगलादेशातल्या सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारलं होतं. त्याला हिंसक वळण लागून विद्यार्थी आणि पोलिसांच्यात झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत १०५ जण ठार झाले आहेत.