January 2, 2026 7:34 PM

views 25

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या  तृणधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा,  यासाठी कृषी  उत्पादनांचे  प्रमा...

December 3, 2025 3:20 PM

views 26

खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान

देशभरात यंदाच्या खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाल्याची माहिती केंद्र सरकारनं काल लोकसभेत दिली. २७ नोव्हेंबरपर्यंतच्या या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सुमारे साडे ७५ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पीकांचा यात समावेश आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.