November 13, 2025 1:42 PM November 13, 2025 1:42 PM

views 55

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यातला पहिला उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु होईल. भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल कडे असून दक्षिण आफ्रिकेचा करणाधार तेंबा बावुमा आहे.   दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ संघादरम्यानचा एकदिवसीय सामना आज राजकोटमधे होईल.

November 7, 2025 8:56 PM November 7, 2025 8:56 PM

views 101

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सर्व महिला क्रिकेट संघाचा सहाय्यक कर्मचारी वर्गालाही ११...

November 2, 2025 6:49 PM November 2, 2025 6:49 PM

views 31

3rd T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय

भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. टीम डेव्हिडनं ७४, तर मार्कुस स्टॉइनिसनं ७४ धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंगनं ३, तर वरुण चक्रवर्तीनं २, तर शुभम दुबेनं एक गडी बाद केला.   भारतानं ५ गडी गमावून १८८ धावा करत, सामन्यातले ९ चेंडू बाकी असताना  विजयी लक्ष्य ...

October 31, 2025 7:03 PM October 31, 2025 7:03 PM

views 29

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी

मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र  भारताच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. अभिषेक शर्माच्या ६८ धावा केल्या. त्याखालोखाल हर्षित राणानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्यांच्याव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. चार फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे सामन्यातले ८ चेंडू बाकी असताना भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला. ...

October 29, 2025 1:32 PM October 29, 2025 1:32 PM

views 41

भारत – ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान टी-२० सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला आज पहिला सामना

क्रिकेटमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणेदोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा पराभवाचा सामना केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा संघ टी-२० मालिका जिंकायचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे.

October 25, 2025 8:23 PM October 25, 2025 8:23 PM

views 43

3rd ODI Cricket: भारतानं सामना जिंकला, रोहित शर्माचं शतक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं रंगलेल्या आजच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील या आधीचे दोन्ही सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.   ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४६ षटकं आणि  ४ चेंडूत २३६ धावा केल्या.  भारतान केवळ ३८षटकं ३ चेंडूत ही धावसंख्या पार केली. रोहित शर्माच्या १२१ धावांच्या खेळीला विराट कोहलीनं ७४ धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांच्या १६७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं हा व...

October 23, 2025 2:35 PM October 23, 2025 2:35 PM

views 62

Cricket 2nd ODI: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकतेल्या, ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.   या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सातव्या षटकातच कर्णधार आणि सलामीवर शुभमन गील ९ धावांवर, तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार रोहीत शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागिदारी करत भारताचा...

October 20, 2025 12:55 PM October 20, 2025 12:55 PM

views 52

ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात

क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचं लक्ष्य होतं. ते त्यांनी २२व्या षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळं तीन सामन्यांच्य...

October 19, 2025 2:52 PM October 19, 2025 2:52 PM

views 76

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका सुरू

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून पर्थ इथं सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय फलंदाज पारशी चमक दाखवू शकले नाही. सलामीवर रोहित शर्मा ८ तर कर्णधार शुभमन गिल दहा धावा करून झटपट बाद झाले. तर विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे हा सामना ३२ षटकांचा खेळला जाईल.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १६ षटकांमध्ये ४ बाद ५२  धावा झाल्या होत्या...

October 14, 2025 8:15 PM October 14, 2025 8:15 PM

views 38

वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका भारतानं जिंकली

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं ७ गडी राखून जिंकला. या विजयामुळं भारतानं ही मालिकाही २-० अशी जिंकली आहे. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.