December 3, 2025 8:26 PM

views 34

ODI Cricket: विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं दमदार शतक

रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५९ धावांच आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केलं. भारतानं ५० निर्धारित षटकात ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या. त्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या शतकवीरांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १९५ धावांची भागिदारी केली. कोहलीनं १०२, तर ऋतुराजनं १०५ धावा केल्या. के एल राहुलनं नाबाद ६६, तर रविंद्र जडेजानं नाबाद २४ धावांचं योगदान दिल. 

December 3, 2025 1:25 PM

views 177

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसरा सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रायपूर इथं भारतीय थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. भारत सध्या या मालिकेत १-०नं आघाडीवर आहे. पहिला सामना भारतानं १७ धावांनी जिंकला होता. याशिवाय, या सामन्यात बरेच विक्रमही प्रस्थापित झाले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षट्कार ठोकायचा विक्रम रोहित शर्मानं आपल्या नावावर केला. तसंच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळायचा विक्रम रोह...

December 1, 2025 1:36 PM

views 45

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात काल रांची इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात ३४९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला ३३२ धावांवर रोखण्यात भारताला यश आलं. त्याधी दक्षिण अफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतातर्फे विराट कोहलीनं आपलं ५२ वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावत नाबाद १३५ धावा केल्या. रोहित शर्मानं ५७ धावा केल्या. तर कर्णधार केएल राहुलनं ६० धावा केल्या. या प्रमुख खेळाडूंच्या ...

November 25, 2025 7:31 PM

views 45

कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा डाव ५ बाद २६० वर घोषित

गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ आज संपला तेव्हा भारताच्या २ बाद २७ धावा झाल्या होत्या. सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल बाद  झाल्यानंतर मैदानात आलेले साई सुदर्शन २ धावांवर आणि कुलदीप यादव ४ धावांवर खेळत होते. याआधी दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे आता सामना जिंकण्यासाठी भारतासमोर ५४९ धावांचं  आव्हान आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेनं ४८९ धावा तर भा...

November 22, 2025 1:14 PM

views 177

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहटी इथं सुरु झाला. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे.   या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ८२ धावांची दमदार सलामी दिल्यानंतर मार्करम आणि रिकल्टन, एकामागोमाग एक बाद झाले. त्यानंतर स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बवुमा यांनी अर्धशतकी भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला.   भारताच्या वतीनं बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ...

November 16, 2025 3:47 PM

views 90

कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव

कोलकाता इथं झालेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर ३० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या ७ बाद ९३ धावांवरून पुढे सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन यांनी ४४ धावांची भागिदारी केली. मात्र बुमरानं कॉर्बिनला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा, ५५ धावांची झुंजार खेळी करुन ...

November 13, 2025 1:42 PM

views 69

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यातला पहिला उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु होईल. भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल कडे असून दक्षिण आफ्रिकेचा करणाधार तेंबा बावुमा आहे.   दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ संघादरम्यानचा एकदिवसीय सामना आज राजकोटमधे होईल.

November 7, 2025 8:56 PM

views 120

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सर्व महिला क्रिकेट संघाचा सहाय्यक कर्मचारी वर्गालाही ११...

November 2, 2025 6:49 PM

views 37

3rd T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय

भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. टीम डेव्हिडनं ७४, तर मार्कुस स्टॉइनिसनं ७४ धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंगनं ३, तर वरुण चक्रवर्तीनं २, तर शुभम दुबेनं एक गडी बाद केला.   भारतानं ५ गडी गमावून १८८ धावा करत, सामन्यातले ९ चेंडू बाकी असताना  विजयी लक्ष्य ...

October 31, 2025 7:03 PM

views 37

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी

मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र  भारताच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. अभिषेक शर्माच्या ६८ धावा केल्या. त्याखालोखाल हर्षित राणानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्यांच्याव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. चार फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे सामन्यातले ८ चेंडू बाकी असताना भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला. ...