October 20, 2024 10:24 AM October 20, 2024 10:24 AM

views 9

कसोटी क्रिकेट मालिकेत आज न्यूझिलंड आणि भारत यांच्यात दुसऱ्या डावाचा सामना

बंगळुरु इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझिलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझिलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या केवळ एका धावेनं हुकलेल्या शतकाच्या जोरावर भारताला ही धावसंख्या उभारता आली. त्याआधी न्यूझीलंडनं 402 धावा केल्या होत्या. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जागतिक कसोटी क्र...

October 18, 2024 9:11 AM October 18, 2024 9:11 AM

views 12

बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी

बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडं आतापर्यंत १३४ धावांची आघाडी आहे.

October 17, 2024 7:44 PM October 17, 2024 7:44 PM

views 15

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावात गारद

न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या. आता न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे. भारताच्या कुलदीप यादव, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आज झालेल्या या सामन्यात फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ अवघ्या ४६ धावांमध्ये गारद झाला. कोहलीसह भारताचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. रिषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ गड...

October 14, 2024 9:27 AM October 14, 2024 9:27 AM

views 2

महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात

महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, शारजाह इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं वीस षटकांत नऊ बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत आठ गडी गमावून 151 धावा केल्या.

October 13, 2024 3:02 PM October 13, 2024 3:02 PM

views 6

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं होणार आहे. दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे.

October 11, 2024 10:55 AM October 11, 2024 10:55 AM

views 11

महिला क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून केला पराभव

महिलांच्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने 20 षटकांत 8 खेळाडू बाद 103 धावा केल्या.   बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने 44 चेंडूत 39 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या करिश्मा रामहरकने बांगलादेशचे 4 गडी बाद केले. आज अ गटात, गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना पाकिस्तान महिला संघाबरोबर - दुबई मध्ये होईल.

October 9, 2024 3:32 PM October 9, 2024 3:32 PM

views 11

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य राहणे असेल मुंबई संघाचा कर्णधार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुंबई संघ जाहीर झाला असून, इराणी चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटू तनुष कोटियन याला मुंबई संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. २०२४-२५ च्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी १६ सदस्यीय मुंबई संघातून तनुष आपलं कसब दाखवेल. स्पर्धेच्या ‘एलिट ग्रुप ए’ चा सामना येत्या शुक्रवारी बडोद्यातल्या कोटांबी क्रीडांगणावर होत असून मुंबई संघाची लढत बडोदा संघाशी होईल. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे आहे.

October 1, 2024 3:52 PM October 1, 2024 3:52 PM

views 9

बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. बांग्लादेशाकडून मिळालेलं ९५ धावांचं आव्हान भारतानं ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका २-० अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर. अश्विन मालिकावीर ठरला.    पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला. जसप्रित बुमराह, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यशस्वी जयस्वालच्या ५१ आणि विराट कोहलीच्या नाबाद २९ धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला.

September 30, 2024 1:55 PM September 30, 2024 1:55 PM

views 10

भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी बांगलादेशनं पहिल्या डावातल्या १०७ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तत्पूर्वी, काल तिसऱ्या दिवसाचा खेळ मैदान ओलं असल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला, तर दुसरा दिवस मुसळधार पावसामुळे पाण्यात गेला. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-० नं आघाडीवर आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नाबाद २९ धावा झाल्या होत्या. 

September 29, 2024 4:09 PM September 29, 2024 4:09 PM

views 2

भारत आणि बांग्लादेशात दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

भारत आणि बांग्लादेशात कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला. पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता तर, पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी बांग्लादेशानं ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकून १-० नं आघाडीवर आहे.