June 27, 2025 6:30 PM June 27, 2025 6:30 PM

views 12

सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना, निश्चित उद्दिष्ट या त्रिसूत्रीच्या आधारावर यश संपादन करता येतं-राज्यपाल

सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दिष्ट या त्रिसूत्रीच्या आधारावर यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. ते आज पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र. कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रामकृष्णन रामन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात २२ देशातील ८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

June 27, 2025 9:46 AM June 27, 2025 9:46 AM

views 18

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा संपन्न

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपतींनी 2021 आणि 2022 या दोन वर्षांच्या स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेली पोलीस पदकं प्रदान केली. 41 पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदकं, 3 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर 39 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं प्रदान करण्यात आली.

April 18, 2025 8:13 PM April 18, 2025 8:13 PM

views 35

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्रानं देशाचं अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. पुण्यात बालेवाडी इथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते.    शिवछत्रपतींचं नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, तेव्हा हा पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी, प्रशिक्षक या सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या...

February 5, 2025 7:17 PM February 5, 2025 7:17 PM

views 14

वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय असून कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जहांगीर कलादालन इथे संपन्न झालं ,त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज...

February 5, 2025 7:15 PM February 5, 2025 7:15 PM

views 4

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. संपूर्ण विश्वाचं उदरभरण करण्याची क्षमता भारतीय कृषिक्षेत्रात आहे, असं ते म्हणाले. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्...

January 9, 2025 3:15 PM January 9, 2025 3:15 PM

views 14

शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत- राज्यपाल

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण हे एक महत्त्वाचं साधन आहे. शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३३व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपालांनी सुवर्णपदक देऊन गौरवलं.   नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आपण परिवर्तनाचं युग सुरू केलं आहे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. विद्यार्थी, समाज आणि उद्यो...

January 7, 2025 7:22 PM January 7, 2025 7:22 PM

views 8

शिक्षकांची निवड गुणवत्तेवर करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याची गरज-राज्यपाल

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांची निवड गुणवत्तेवर करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याची गरज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. यावेळी १ लाख ६४ हजार ४६५ विद्यार्थ्यांना पदवी तर ४०१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि १८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून ती आयुष्यभर सुरु असली पाहिजे असं सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीनं शिकावं असं राज्यपाल म्हणाले. ...

December 25, 2024 3:30 PM December 25, 2024 3:30 PM

views 11

१९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

१९ व्या 'मोहम्मद रफी' पुरस्काराचं वितरण काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना यंदाचा 'मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार' मरणोत्तर देण्यात आला. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणारे जावेद अली यांना 'मोहम्मद रफी पुरस्कार २०२४'नं राज्यपालांनी सन्मानित केलं . एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून, ५१ हजार रुपये आणि स...

November 24, 2024 7:09 PM November 24, 2024 7:09 PM

views 7

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना आणि राजपत्राच्या प्रती भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज राज्यपाल सी राधाकृष्णन यांना सादर केली. विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यात निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास आणि कक्ष अधिकारी निरंजन कुम...

September 17, 2024 5:55 PM September 17, 2024 5:55 PM

views 10

नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव

नेत्रदान हे महान कार्य असून यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपण इतरांच्या माध्यमातून जगू शकतो, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे जे रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन इथं २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी नेत्रदान करावं असं आवाहन करत नेत्रदान ही चळवळ बनावी अशी...