March 5, 2025 3:36 PM March 5, 2025 3:36 PM

views 12

देशात १६ कोटी ७० लाख टनांपेक्षा जास्त कोळसा उत्पादन

देशातल्या खाण क्षेत्रात चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत १६ कोटी ७० लाख टनापेक्षा जास्त कोळसा उत्पादन झाल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा १२ कोटी ६० लाख टन इतका होता. वीज, पोलाद आणि सिमेंटसारख्या क्षेत्रांना अखंड कोळसा पुरवठा होत आहे. हा पुरवठा अखंड राहावा आणि या क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.  

February 13, 2025 3:34 PM February 13, 2025 3:34 PM

views 16

कोळसा उद्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं मंत्री जी किशन रेड्डी यांचं प्रतिपादन

कोळसा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले. नागपूर इथं भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कोळसा मजदूर संघटनेच्या अधिवेनाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. आपल्या देशात लिथियम, कॉपर यासारख्या धातुंची कमतरता असून ते विदेशातून आयात करावे लागतात असंही रेड्डी यांनी सांगितलं.

August 28, 2024 10:17 AM August 28, 2024 10:17 AM

views 7

देशाच्या कोळसा उत्पादनात यावर्षी ७.१२ टक्के वाढ

देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात या वर्षी आतापर्यंत 7.12 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवल्याचं कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.25 ऑगस्टपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आर्थिक वर्षात देशाचं एकत्रित कोळसा उत्पादन वाढून 370 दशलक्ष टन झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 346 दशलक्ष टन इतकं होतं.तसंच कोळशाच्या वितरणातही लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी 25 ऑगस्टपर्यंतचं वितरण 397 दशलक्ष टनांवर पोहोचलं आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, मागील गेल्या वर्षीच्या 376 दशलक्ष टन वितरणाच्या तुलनेत आत...

August 13, 2024 7:38 PM August 13, 2024 7:38 PM

views 3

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रसरकारची महत्त्वाकांक्षी योजना

देशात कोळसा उत्पादन वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्रसरकारने आखली आहे. जागतिक पातळीवर खाण उद्योगात कार्यरत कंपन्यांकडे हे काम सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता उपलब्ध होईल असं केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. या कंपन्या कोळसा उत्खननाबरोबरच पुनर्वसन, भूसंपादन, पर्यावरण विषयक परवानग्या तसंच केंद्र आणि राज्यसरकारांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरचा समन्वय ही कामं देखील हाताळणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.