November 8, 2025 6:59 PM November 8, 2025 6:59 PM

views 22

गडचिरोलीत विविध विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल, वेलनेस रुग्णालय  आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरीत महिला आणि बाल रुग्णालयाचंही  लोकार्पण झालं.  महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्या...

October 31, 2025 2:19 PM October 31, 2025 2:19 PM

views 133

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलपर्यंत या समितीच्या शिफारशी येतील, त्यानुसार पुढच्या तीन महिन्यात कर्जमाफी मिळेल, असंही ते म्हणाले.   अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात असून त्यापैकी ८ ...

October 29, 2025 3:36 PM October 29, 2025 3:36 PM

views 31

नीती आयोगाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या रोडमॅपचं प्रकाशन

औद्योगिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून देश याबाबतीत जगाचं नेतृत्व करेल, तेव्हा महाराष्ट्र देशात आघाडीवर असेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या रोडमॅपचं प्रकाशन आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.   वर्ष २०३५ पर्यंत जीडीपीतलं या क्षेत्राचं योगदान २५ टक्क्यांवर नेणं, १० कोटीपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणं आणि जगातल्या तीन सर्वोच्...

October 15, 2025 3:15 PM October 15, 2025 3:15 PM

views 49

६१ नक्षली अतिरेक्यांचं गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्त्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह ६१ नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर  आत्मसमर्पण केलं.     २०१४ पासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला आहे. असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आता फक्त काही मोजके नक्षलवादी बाकी असून तेही लवकरच आत्मसमर्पण करतील कारण त्यांना आता कोणीही नेता उरलेला नाही.   मार्च २०२६ देश नक्षलमुक्त करण्याचं के...

September 30, 2025 9:10 PM September 30, 2025 9:10 PM

views 489

ओला दुष्काळ नियमात बसत नसला, तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.    राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करायला सुर...

September 26, 2025 9:34 AM September 26, 2025 9:34 AM

views 62

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, असंही या निवेदनात म्हटलं आहे. कालपर्यंत 17 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात दिलं. पडलेली घरं,...

September 19, 2025 6:45 PM September 19, 2025 6:45 PM

views 28

नवे उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगांसाठीच्या सुधारणांची अंमलबजावणी करु नवे उद्योग सुरू करण्यासाठी जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.    उद्योगासाठी लागणाऱ्या बऱ्याच परवानग्या अनेक विभागांशी संबंधित असतात. अशावेळी एकाच अर्जामध्ये संबंधित सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करावी.  पुन्हा अर्ज करण्याची वेळ उद्योजकावर येणार नाही, याची काळज...

September 17, 2025 8:58 PM September 17, 2025 8:58 PM

views 21

लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा शुभारंभ आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.   राज्यातल्या एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा  संकल्प असल्याचा निर्धार त्यांनी याव...

September 17, 2025 3:09 PM September 17, 2025 3:09 PM

views 10

बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचं तसंच अंमळनेर ते बीड रेल्वेमार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होईल, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं.   ही गाडी रेल्वेच्या इंजिनावर धावेल तेव्हा वेग वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील, असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनावणे, रजनी पाटील, आमदार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे...

September 12, 2025 10:05 AM September 12, 2025 10:05 AM

views 35

राज्यात एक लाख ९ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह झालेल्या गोलमेज परिषदेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले... गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे. ती ...