November 17, 2025 7:41 PM

views 26

शासकीय सेवांच्या भर्ती परीक्षांच्या निकालानंतर ४ दिवसात नियुक्तीपत्रं मिळणार

शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसात संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणांबाबत आयोजित सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.    नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा केल्य...

November 16, 2025 6:05 PM

views 58

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपांच चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल-मुख्यमंत्री

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागावाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झालेली नाही. यावर चर्चा सुरू आहे, असंही ते म्हणाले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र शक्य त...

November 15, 2025 4:23 PM

views 19

अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे मुखमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले होते. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला उपस्थित होते.

November 8, 2025 6:59 PM

views 31

गडचिरोलीत विविध विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल, वेलनेस रुग्णालय  आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरीत महिला आणि बाल रुग्णालयाचंही  लोकार्पण झालं.  महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्या...

October 31, 2025 2:19 PM

views 138

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलपर्यंत या समितीच्या शिफारशी येतील, त्यानुसार पुढच्या तीन महिन्यात कर्जमाफी मिळेल, असंही ते म्हणाले.   अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात असून त्यापैकी ८ ...

October 29, 2025 3:36 PM

views 35

नीती आयोगाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या रोडमॅपचं प्रकाशन

औद्योगिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून देश याबाबतीत जगाचं नेतृत्व करेल, तेव्हा महाराष्ट्र देशात आघाडीवर असेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या रोडमॅपचं प्रकाशन आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.   वर्ष २०३५ पर्यंत जीडीपीतलं या क्षेत्राचं योगदान २५ टक्क्यांवर नेणं, १० कोटीपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणं आणि जगातल्या तीन सर्वोच्...

October 15, 2025 3:15 PM

views 56

६१ नक्षली अतिरेक्यांचं गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्त्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह ६१ नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर  आत्मसमर्पण केलं.     २०१४ पासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला आहे. असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आता फक्त काही मोजके नक्षलवादी बाकी असून तेही लवकरच आत्मसमर्पण करतील कारण त्यांना आता कोणीही नेता उरलेला नाही.   मार्च २०२६ देश नक्षलमुक्त करण्याचं के...

September 30, 2025 9:10 PM

views 504

ओला दुष्काळ नियमात बसत नसला, तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.    राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करायला सुर...

September 26, 2025 9:34 AM

views 69

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, असंही या निवेदनात म्हटलं आहे. कालपर्यंत 17 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात दिलं. पडलेली घरं,...

September 19, 2025 6:45 PM

views 37

नवे उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगांसाठीच्या सुधारणांची अंमलबजावणी करु नवे उद्योग सुरू करण्यासाठी जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.    उद्योगासाठी लागणाऱ्या बऱ्याच परवानग्या अनेक विभागांशी संबंधित असतात. अशावेळी एकाच अर्जामध्ये संबंधित सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करावी.  पुन्हा अर्ज करण्याची वेळ उद्योजकावर येणार नाही, याची काळज...