December 24, 2024 6:43 PM December 24, 2024 6:43 PM

views 3

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसचं राजकारण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जपण्याचं काम केंद्र सरकार आणि भाजपाने केलं आहे मात्र काँग्रेसने त्यांना कोणताही सन्मान दिलेला नाही. त्यांना निवडणूकीत पराभूत केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसने राजकारण केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 

December 24, 2024 8:05 PM December 24, 2024 8:05 PM

views 9

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री

राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारी सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी या गावातल्या प्रकल्पांचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज पुरवणारे सर्व फीडर स...

December 22, 2024 1:59 PM December 22, 2024 1:59 PM

views 18

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. गृह आणि ऊर्जा खातं तसंच विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खाते (सार्वजनिक उपक्रम) देण्यात आलं आहे. जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे. चंद्रशेखर बा...

December 19, 2024 8:17 PM December 19, 2024 8:17 PM

views 12

राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या, शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही, असं ते म्हण...

December 16, 2024 6:22 PM December 16, 2024 6:22 PM

views 11

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार-देवेंद्र फडनवीस

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यावर बातमीदारांशी बोलत होते. सरकार कुठलीही माहिती लपवून ठेवणार नाही, असं ते म्हणाले.    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की पक्ष आणि सरकार हे दोन्ही महत्त्वाचे असतात. काहींना पक्षाची जबाबदारी देण्यासाठी मंत्रिमंडळात सामावून घेतलं जात नाही. असं फडनवीस म्हणाले.

December 16, 2024 3:06 PM December 16, 2024 3:06 PM

views 23

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.    त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.  बीडमधील हत्या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसंच, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण...

December 16, 2024 9:38 AM December 16, 2024 9:38 AM

views 15

हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच, हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

December 15, 2024 9:26 AM December 15, 2024 9:26 AM

views 41

सृजनशील समाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं काळाची गरज – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना, अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं आयोजन केले पाहिजे, याकरीता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमं...

December 14, 2024 10:13 AM December 14, 2024 10:13 AM

views 13

भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला भारताचे पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.‘‘हमारे देश में केवल आर्थिक और सामाजिक ने तो सांस्कृतिक पुन...

December 13, 2024 7:53 PM December 13, 2024 7:53 PM

views 27

महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र २०२८ ते २०३० पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्ध्या ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट पार केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.    महाराष्ट्राला देशातलं सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकच...