February 6, 2025 7:23 PM February 6, 2025 7:23 PM

views 6

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आवश्यक असल्याचं फडनवीस म्हणाले. उद्योगांना त्रास दिल्याच्या, खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत असून असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे करणारे महायुतीतल...

February 5, 2025 8:18 PM February 5, 2025 8:18 PM

views 14

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्...

February 3, 2025 8:40 PM February 3, 2025 8:40 PM

views 8

सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा मुख्यंत्र्यांकडून आढावा

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातल्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५३१ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित घरांच्या कामांना गती देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यासोबत आयुष्मान भारत आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ राज्यातल्या रुग्णांना मिळावा, यासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसंच यामधला मानवी हस्तक्षे...

February 3, 2025 8:50 AM February 3, 2025 8:50 AM

views 12

आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आदिवासींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार केल जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल. आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं, केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नागपूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय 'फिस्ट-2025' या परिषदेत ते काल बोलत होते. नागपूर शहर, आदिवासी राजानं स्थापन केलेलं असल्यामुळ, ही परिषद य...

February 2, 2025 7:45 PM February 2, 2025 7:45 PM

views 12

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं महानुभाव पंथाच्या अनेक मंदिराचा विकास केला आहे, तसंच रिद्धपूर पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान या ठिकाणीही संवर्धनाच...

January 28, 2025 8:30 PM January 28, 2025 8:30 PM

views 3

जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागानं ती करावी, असं त्यांना सांगितलं.   हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेलं अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे ...

January 27, 2025 7:11 PM January 27, 2025 7:11 PM

views 14

पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातल्या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्यानं तपासणी, रिअल टाईम मॉनिटिरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. छोट्या छोट्या स्त्रोतांचं प्रदुषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.   मत्स्य व्यवसाय ...

January 26, 2025 7:26 PM January 26, 2025 7:26 PM

views 8

मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तरवाहिनी मार्गासह इतर तीन आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुल्या होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच मंत्री आशीष शेलार, मंगल प्...

January 24, 2025 9:11 AM January 24, 2025 9:11 AM

views 8

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्र्यांनी काल दावोसमधून दूरस्थ प्राणलीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईतून सहभागी झाले होते. दावोसमध्ये गुंतवणू...

January 18, 2025 2:41 PM January 18, 2025 2:41 PM

views 13

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार- मुख्यमंत्री

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते.   ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांना पोहोचणं शक्य नसतं तिथले रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकरणार आहेत. दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे, असं फडणवीस म्हणाले. या...